लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Tuesday 29 May 2018

दांभिक सावरकर

"आसिंधुसिंधू भारतभूमिका हि ज्याची पितृभूमी नि पुण्यभू आहे तो हिंदू" अशी हिंदू शब्दाची ची व्याख्या करत बौद्ध, शीख, जैन धर्मियांना "हिंदू" च्या व्याख्येत समाविष्ठ करून घेत सावरकरांनी त्यांना हिंदुत्वाचे अधिकारी जरूर ठरवलं. पण बाबासाहेबानी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मांचा स्वीकार करायचा निर्णय घेतला तेंव्हा मात्र या वीराच्या निधड्या छातीत धडकी भरली. अपचनाचा त्रास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसारखे ते बेचैन झाले आणि बाबासाहेबांवर आपल्या फुसक्या युक्तिवादाच्या टिकाश्त्राने वार करण्यास सुरुवात केली.

आंबेडकरांवर टिका करताना 1956 ला सावरकर लिहतात :
"अस्पृश्यानी हिंदू धर्म सोडू नये भिक्षु आंबेडकरांच्या "थापांना" त्यांनी बळी पडू नये. अस्पृश्यांनी आपल्या स्वतःच्या पूर्वजांना आंबेडकरांच्या नादी लागून पाखंड्यात , पतीतांत किंवा मुर्खात काढू नये. अस्पृश्य हिंदू राहतील तरच अस्पृश्यता अधिक सुलभतेणे नाहीशी होईल." त्यांनी आंबेडकरांच्या निर्णयाचं स्वागत न करता त्यांना थापाडे हिंदुराष्टद्रोही भिक्षु दुष्कर्मी आंबेडकर अशी दुषणे देत टीका केली आहे. केसरी मध्ये ओक्टोम्बर 30, 1956 मध्ये सावरकर लिहतात कि "पूर्वी बौद्धांनी म्लेच्छांशी हातमिळवणी करून म्लेंछे राज्ये भारतात स्थापून हिंदुराष्ट्रद्रोह केला तोच आंबेडकर आज करत आहेत हिंदुराष्ट्राच्या या हितशत्रूंन पासून अखंड सावधान असावे हेच उत्तम, आंबेडकरांच्या या धर्मांतराचे आंधळे कौतुक करू नये"

बाबासाहेब हे बौद्ध धर्माचा स्वीकार करून देखील त्यांनीच दिलेल्या हिंदू व्याख्येप्रमाणे हिंदूच राहणार होते ना? बाबासाहेबांचे आणि त्यांच्यासोबत धर्म परिवर्तन करणारे त्यांचे अनुयायी यांचे पूर्वज देखील प्राचीन काळापासून भारतभूमीतच निवसत आलेच होते ना? त्यामुळे भारतभूमी हीच त्यांची पितृभूमी ठरतच होते कि ? भारत भूमी देखील बौद्धांसाठी पुण्यभूच(holy land) आहे ना? बौद्ध धर्माचा स्वीकारकेल्यामुळं मुस्लिम किंवा इसाई धर्मियांसारखी अरबस्थान किंवा पॅलिसटाइन हि त्यांची पुण्यभू ठरणार तर न्हवतेच ना ? सावरकरांनी दिलेल्या हिंदूंच्या या व्याख्येत बौद्धधर्म पूर्ण फिट होतच होता ना ? त्यामुळे बौद्धधर्मीय पूर्णपणे हिंदुत्वाचे अधिकारी ठरत होतेच ना ? मग सावरकरांना आंबेडकरांचा हिंदू धर्म त्यागाच्या निर्णयाचा विषाद का वाटावा ? त्यांना मिरची लागायचं कारण काय ?

यातून त्या वीराच्या छातीत दडलेला कट्टर सनातनी हिंदू धर्मियच प्रकट झालेला दिसत आहे. हाच तो त्या वीराचा नि हिंदुत्ववाद्यांचा उपयुक्ततावाद मुस्लिम जमातवाद्यांशी लढण्यापुरतेच ते हिंदुत्वाचे अधिकारी इतरवेळी शीख बौद्ध जैन धर्मीय हे वेगवेळे हिंदू न्हवे !

टीप- मुस्लिम आणि इसाई लोकांना फक्त त्यांच्या धर्ममतांमुळे भारतभूमी हि पुण्यभू नाही असं समजणे देखील भारताच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक विकासाला हातभार लावणाऱ्या भारतीय मुस्लिम आणि इसाई धर्मियांचा हा अपमानच आहे. हा अब्दुल कलमांचा अपमान आहे हा भरतभूमिचा रक्षणासाठी शाहिद झालेल्या लढलेल्या प्रत्येक मुस्लिम इसाई जवानांचा, पोलिसांनाच देखील अपमान आहे...
Sagar Waghmare यांच्या फेसबुक भिंतीवरून)

No comments:

Post a Comment