लेखक/संपादक/संकलक : विराज शांताराम

Tuesday 6 September 2016

राजकीय नेते आणि त्यांच्या जीवनातील स्त्रीया

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्ली सरकारमधील मंत्री संदीप कुमार यांचा एक सेक्स व्हिडिओ नुकताच उजेडात आला. त्यानंतर केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिमंडळातून आणि आम आदमी पार्टीतून त्यांची हकालपट्टी झाली. आम आदमी पार्टीचे एक नेते तथा माजी पत्रकार आशतोष यांनी या निमित्ताने भारतीय राजकारणातील नेते आणि स्त्रीसंबंधांवर एक ब्लॉग लिहिल्याने नवा भूकंप झाला आहे. आशुतोष यांनी पं. नेहरू यांच्या पासून अटलविहारी वाजपेयी यांच्यापर्यंत साºयांचीच अंडीपिल्ली बाहेर काढली आहेत. आशुतोष यांचा लेख इंग्रजीत आहे. त्याचा थोडक्यात मराठी गोषवारा असा :
पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे आपल्या अनेक महिला सहकाºयांसमवेत संबंध असल्याच्या चविष्ट चर्चा होत आल्या आहेत. त्यांचे एडविना माउंटबॅटन यांच्या सोबतच्या संबंधांवर नेहमीच चर्चा होत आली. नेहरूंच्या मृत्यूपर्यंत दोघांतील प्रेमभाग कायम होता. १९१0 च्या दशकात महात्मा गांधी यांनी सरला चौधरी यांना आपली अध्यात्मिक पत्नी मानले होते. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कस्तुरबा गांधीही चिंतित झाले होते. सरला चौधरी रविंद्रनाथ टागोर यांच्या नात्यातील होत्या. सी. राजगोपालचारी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकून सरला चौधरी यांना गांधीजींपासून दूर होण्यास भाग पाडले. आपल्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगात गांधीजी आपल्या दोन तरुण भाच्यांसोबत (की पुतण्या) नग्न झोपत असत. नेहरूंनी असे करू नका, असा सल्ला त्यांना दिला. पण गांधी बधले नाहीत.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी आपल्या एका महिलेला विवाह न करताच जीवनसाथी बनविले. दोघे आयुष्यभर एकत्र राहिले. त्यांचे सहकारी जॉर्ज फर्नाडिस यांनी लैला कबीर यांच्याशी लग्न केले. पण जया जेटली यांच्या सोबतही त्यांची जीवनभर मैत्री राहिली. भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘आपण अविवाहित आहोत, ब्रह्मचारी नव्हे’ असे संसदेतच सांगितले होते. ते आपल्या एका महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत उघडपणे एकत्र राहत होते. या नेत्यांचे महिलांसोबतचे संबंध त्यांच्या राजकीय जीवनात अडसर ठरले नाहीत. कारण ते बडे नेते होते. आम्ही बच्चे आहोत, म्हणून आमच्याकडे बोट दाखविले जात आहे. पण लक्षात ठेवा, बच्चे लोकच काळाचा प्रवाह बदलून इतिहास घडवित असतात.
( आशुतोष यांचा हा ब्लॉग एनडीटीव्हीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. त्यावरून आता राष्टÑीय महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. या ब्लॉगमध्ये चीनचे नेते माओ त्से तुंग यांच्या स्त्रीलंपटपणाचे खळबळजनक किस्से दिले आहेत.)

Friday 4 March 2016

Urmila Matondkar Got Married With Kashmiri Muslim Man


‘Rangeela' actress Urmila Matondkar, a brahman girl got married to her Kashmiri Muslim boyfriend Mohsin Akhtar Mir recently in a traditional Hindu ceremony at her Bandra residence in Mumbai. The wedding was a very private affair with only Urmila and Mohsin's family and closest friends attending the auspicious ceremony. However, as per the latest reports on BollywoodLife.com, the newly-married couple will now have a Muslim wedding, aka Nikah, soon after their marriage is registered this week. The couple even plan to throw a grand and lavish reception for the film fraternity and friends outside the industry in a few days from now. Looks like, there are celebrations galore at Urmila's residence, at least, for a few days!

According to reports, the two had met during Manish's niece's wedding in 2014 and hit it off immediately. While the wedding was a close-knit affair, only one Bollywood celeb had made it there. It was Mohsin and Urmila's mutual friend, Manish Malhotra.

Mohsin Akhtar Mir is a part of the Indian film industry. However, that was not always the case. Mohsin is the scion of a well-to-do Kashmiri business family. Like most families, Mohsin's parents wanted him to takeover the reins of the family business once he was 21. They also wanted him to tie the knot and settle down. But, Mohsin, who was bitten by the acting bug, had other plans. He ran away from home and came to Mumbai to chart his own course in Bollywood.

Mohsin Akhtar Mir was a part of Farhan Akhtar-starrer, 'Luck By Chance.' The actor had a very short role but one that was impactful. He played the male model who proved to be Farhan's competitor in the film. Mohsin has played the lead role in 'It's A Man's World.' He is a male prostitute in the film that was directed by Saurabh Sengupta and also starred Mouli Ganguly. He was also a part of the film, 'Mumbai Mast Kalandar.'

Mohsin, who now delves into the Kashmiri embroidery business, is ten years younger to Urmila Matondkar, who turned 42 recently. Mohsin was the second runner-up at the Mr India model hunt of 2007. While he has gone back to his roots and is at the helm of his family business, Mohsin was also a part of AR Rahman's music video, 'Taj Mahal.'

93 years ago, Nehru had a Kanhaiya moment in Nabha

93 years ago, Nehru had a Kanhaiya moment in Nabha

March 4, 2016, 2:38 PM IST  in Paperweight | India | TOI
I bought Jawaharlal Nehru’s autobiography 10 years ago on a visit to Rajghat, but started reading it only the night when Kanhaiya was beaten up in court. I read only a chapter or two a day, and yesterday afternoon, I was on Chapter 16: An Interlude at Nabha. It’s a startling account; makes you wonder whether India has moved at all in these 93 years.
Prime Minister Pandit Jawaharlal Nehru addressing a public meeting on Ramlila Grounds in New Delhi on June 20, 1956, on the eve of his departure for Europe.
In 1923, Nehru, AT Gidwani and K Santanum visited Jaito in Nabha, Punjab to witness a peaceful chain protest by Sikhs. The Sikhs used to come in batches called jatthas. Each jattha was beaten up by police and bundled away in carts. But another came to take its place.
When Nehru and his companions arrived, the British administrator of the state ordered them not to enter Nabha (they were already inside), and if they had entered, to leave immediately (not possible, there was no train at that hour). So they were arrested for breach of the administrator’s order. For a couple of days they remained in an insanitary jail, and then their trial started.
Late one evening, they were taken to a different court room. “I inquired where we were and what was happening. I was informed that it was a court-room and we were being tried for conspiracy.”
Nehru writes the more serious charge of conspiracy was trumped up to make an example of them. “It was evidently thought that the maximum sentence for this breach (of order) being only six months was not enough punishment for us and a more serious charge was necessary.”
But the law said a conspiracy needed to have at least four conspirators, “so a fourth man, who had absolutely nothing to do with us, was arrested and put on his trial with us. This unhappy man, a Sikh, was not known to us, but we had just seen him in the fields on our way to Jaito.”
Nehru protested that the conspiracy trial had been started without notice and he would have liked to arrange a lawyer. The court told him to choose one in Nabha. “When I suggested I might want some lawyer from outside I was told that this was not permitted under the Nabha rules.”
The government was only trying to intimidate them. The jail superintendent made them an offer on behalf of the administrator: “If we would express our regret and give an undertaking to go away from Nabha, the proceedings against us would be dropped.”
The trial was a farce. “On the last day, when the prosecution case was closed, we handed in our written statements. The first court adjourned and, to our surprise, returned a little later with a bulky judgment written out in Urdu. Obviously this huge judgment could not have been written during the interval… The judgment was not read out; we were merely told that we had been awarded the maximum sentence of six months for breach of the order to leave Nabha territory… In the conspiracy case we were sentenced the same day to either eighteen months or two years, I forget which.”
The trial had been held in complete secrecy. “No newspaperman or outsider was allowed in court. The police did what they pleased, and often ignored the judge or magistrate and casually disobeyed his directions.”
They were sentenced, but, “We did not know what the judgments contained… We asked for copies of the judgments, and were told to apply formally for them.”
That same evening, the administrator “suspended” their sentences, without attaching any conditions. Note, the sentences were merely suspended, not revoked. Nehru never came to know what his sentence said. But his chief worry was that it hung like a sword over him. “For aught I know, these sentences may still be hanging over me, and may take effect whenever the Nabha authorities or the British government so choose.”
What became of the Sikh, their co-conspirator?
“We found out that he was one of the old ‘Komagata Maru’ lot, and he had only recently come out of prison after a long period. The police do not believe in leaving such people out, and so they tacked him on to the trumped-up charge against us.”
Story sounds familiar? Be the change.

Monday 29 February 2016

शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!

दैनिक सामना मध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख

 शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!
Monday, February 29th, 2016
छत्रपती शिवाजीसारखा न्यायप्रिय राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. स्त्रीचारित्र्यावर घाला घालणार्‍यांना कडेलोटाची सजा फर्मावणारा हा राजा महाराष्ट्रात जन्मास आला व इतिहास घडला. त्या राजाचे शिवस्मारक रोखण्याची भाषा कराल तर याद राखा! होय, माय लॉर्ड! तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनच आम्ही हे निर्भीडपणे सांगत आहोत. तुमचा कायदा तुमच्यापाशी. महाराष्ट्र फक्त शिवरायांना पुजतो व त्यांचाच कायदा मानतो!

माय लॉर्ड, जरा जपून!शिवरायांच्या वाटेला जाऊ नका!!

‘‘भ्रष्टाचार, अप्रामाणिकपणा, फसवणूक इत्यादी गैरप्रकारांना न्यायालयांमध्ये जेवढा वाव मिळतो तेवढा इतरत्र कोठेच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून सरकार कायदे करून आपल्या परीने प्रयत्न करीत असते. न्यायालयाचे कामकाज चालू असताना सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, इकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे.’’
– लॉर्ड हेलरॉम
(इंग्लंडचे माजी न्यायमंत्री)

हिंदुस्थानची ‘न्यायव्यवस्था’, संसदीय पद्धत आपण ब्रिटिशांकडून घेतली आहे. त्यामुळे तेथील न्यायव्यवस्थेचे सर्व गुणदोष आपल्या न्यायव्यवस्थेत उतरले आहेत. आपली न्यायालये सध्या न्यायदानापेक्षा ‘कायदाबाह्य’ विषयांत जरा जास्तच रस घेऊ लागली आहेत. वाघाच्या तोंडास रक्त लागले तर एकवेळ चालेल, कारण वाघ असला तरी तो ऊठसूट कुणावरही झडप मारून रक्त पीत नाही. पोट भरले असेल तर तो शिकार करीत नाही, पण लांडग्याच्या तोंडास रक्त लागले तर ते वाईट. त्याला लांडगेतोडीची चटक लागते व तो कुणाचेही लचके तोडीत धुमाकूळ घालतो. आमच्या न्यायालयांच्या तोंडास राजकारण्यांचे रक्त लागले आहे. हे तोंड वाघाचे की लांडग्याचे हे ज्याचे त्याने ठरवावे. जो समोर येईल त्याचे लचके न्यायमंदिरात तोडले जात असतील तर तेथे डॉ. आंबेडकरांचा कायदा नसून जंगलचा कायदा आहे काय? असा प्रश्‍न पडतो. राज्यकर्ते, राजकारणी व समोर येईल त्याला रोज न्यायालये फटकारीत आहेत. हे सर्व तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा तसे चालले आहे, पण मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन ‘रामशास्त्र्यां’नी छत्रपती शिवाजी महाराजांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. रामशास्त्र्यांनी लोकनियुक्त सरकारच्या मानेवर सुरा ठेवून खंडणी मागावी अशा आवेशाने सांगितले की, ‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे स्मारक रोखू!’ ही धमकीच म्हणावी लागेल. अशी धमकी एखाद्या गुंडाने किंवा राजकीय कार्यकर्त्याने दिली असती तर त्याच्यावर खंडणी, जबरन वसुली, किडनॅपिंग, चोरी अशी विविध कलमे लावून गुन्हा दाखल केला असता. पण तोच ‘गुन्हा’ न्यायमंदिरात झाला असेल तर शिक्षा कुणाला ठोठावायची? महाराष्ट्रातला शेतकरी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करतो आहे. त्यानेही जर असेच कुणाच्या कानशिलावर बंदूक ठेवून ‘कर्जफेड’ करून घेतली असती तर माननीय न्यायालयाने त्या गरीब शेतकर्‍यालाही फासावर लटकवले असते. हा विषय राहू द्या बाजूला. रामशास्त्र्यांनी आतापर्यंत सरकारी कामात अनेकदा हस्तक्षेप केला आहे, पण आता शिवस्मारकावरच ताशेरे मारल्यामुळे
महाराष्ट्राच्या श्रद्धा व अस्मितेवरच हातोडा
पडला आहे. ‘‘माझगाव कोर्टाची इमारत दुरुस्त करा, नाहीतर समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक रोखू!’’ असा दम एकवेळ दळभद्य्रा पाकिस्तानी अफझलखानाने दिला असता तर त्या अफझलखानाचा आणखी एक कोथळा मराठी माणसाने काढला असता, पण शिवस्मारकास रोखण्याची भाषा करणारे याच मातीतले आधुनिक रामशास्त्री आहेत. अशा प्रकारची न्यायबाह्य (बेताल वक्तव्य कसे म्हणावे? रामशास्त्र्यांचा अवमानच होईल हो!) वक्तव्ये करून रामशास्त्री काय साध्य करू इच्छितात? माझगाव न्यायालयाच्या इमारतीची डागडुजी आवश्यक असेल तर तशी मागणी नियमानुसार करा, पण शिवस्मारकासाठी पैसे आहेत, पण कोर्टाच्या डागडुजीसाठी नाहीत. पैसे मंजूर करा नाहीतर शिवस्मारक रोखू असे वक्तव्य करणे न्यायालयाच्या कोणत्या भाषेत बसते? इकडे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या दातावर मारायला पैसे नाहीत. मुंबई-ठाण्यातील सामान्यांच्या घरांचा प्रश्‍न बिकट आहे. गिरणी कामगार, पोलीस कर्मचार्‍यांची घरे होत नाहीत व यातील बरीच प्रकरणे न्यायालयातच ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने लटकून पडली आहेत. सरकारला एखादा आदेशच द्यायचा असेल तर तो याप्रश्‍नी द्या. माझगावचे कोर्ट गळते व ते दुरुस्त व्हायला हवे हे मान्य, पण त्या गळक्या कोर्टावरून तुम्ही छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणार असाल तर या रामशास्त्र्यांची डोकी खरोखरच ठिकाणावर आहेत काय? हा प्रश्‍न महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाची जनता विचारल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या चार स्तंभांपैकी न्यायालय हा एक स्तंभ आहे. पण लोकांनी निवडूून दिलेली ‘राज्यव्यवस्था’ हादेखील एक स्तंभ आहे हे न्यायालयाने विसरू नये. सरकारने एखादा लोकहितकारी निर्णय घ्यावा व न्यायालयाने त्यात हटकून बांबू टाकावा असे आता रोजच घडते आहे. आज ते शिवस्मारकावर बोलले. उद्या सांगतील, ‘इंदू मिलची १४ एकर जागा भारतरत्न डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला द्यायची गरजच काय? हा सरकारी पैसा व जमिनीचा अपव्यय आहे!’ गुजरातेत वल्लभभाई पटेल यांचा उंच पुतळा उभारला जात आहे. त्या उंचीवर व खर्चावरही न्यायालय हातोडा मारेल.
रामशास्त्र्यांच्या डोक्यात
काय येईल त्याचा भरवसा नाही. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय व कसे करायचे त्याचा निर्णय महाराष्ट्राचे लोकनियुक्त सरकार घेईल व शिवस्मारकास पैसे कमी पडू देणार नाही. प्रश्‍न आहे हे स्मारक समुद्रात करायचे की आणखी कोठे. तेसुद्धा सरकार ठरवेल. आमचे रामशास्त्रींशी भांडण नाही. शिवस्मारकाच्या निमित्ताने छत्रपतींचा अवमान झाला म्हणून आम्हाला आमचे विचार मांडावे लागले. शिवराय जन्माला आले नसते तर काय झाले असते याची चिंता आमच्या रामशास्त्र्यांनी जास्त करावी. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या शत्रूला गाडले नि पुढच्या दीडशे वर्षांत मराठ्यांनी सार्‍या हिंदुस्थानभर तलवार गाजविली. शिवरायांच्या महाराष्ट्रानेच देशाचे व धर्माचे रक्षण केले म्हणून रामशास्त्री आजही सुरक्षित आहेत, नाहीतर कवी भूषण यांनी सांगितल्याप्रमाणे-
काशी की कला जाती
मथुरा मे मस्जिद बसती
अगर शिवाजी न होते
तो सुन्नत होती सबकी …

ही गत सगळ्यांचीच झाली असती व आजचे रामशास्त्रीही त्यास अपवाद नसते. शिवरायांमुळेच आज राष्ट्रीयत्वाचा पुकारा देशात होत आहे. पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्राला शहाणपण शिकवून स्वत:ची अक्कल पाजळणारे दिसतात तेव्हा आश्‍चर्य वाटते. जे रामशास्त्री आज शिवस्मारकाच्या बाबतीत ‘बेताल’ विधान करीत आहेत तेच रामशास्त्री मुसलमान, ख्रिश्‍चन व बौद्ध धर्मातील श्रद्धास्थानांविषयी इतकी बेताल विधाने करू शकतील काय? मोहम्मद पैगंबराचे व्यंगचित्र छापले म्हणून फ्रान्समध्ये पत्रकारांची मुंडकी उडवली गेली व वृत्तपत्रांच्या कार्यालयांत रक्ताचे सडे पाडले गेले. शिवस्मारक रोखण्याची भाषा करणारे देशात समान नागरी कायदा लावू शकत नाहीत व ३७० कलमाची तरफदारी हिमतीने करू शकले नाहीत. मशिदींवरील कर्कश बांगा कायद्याला न जुमानता सुरूच आहेत ना! काय केले आमच्या रामशास्त्र्यांनी? बेळगावातील
सीमा बांधवांचा प्रश्‍न
सर्वोच्च न्यायालयात लटकत पडला आहे. तरीही त्या न्यायालयास धाब्यावर बसवून कानडी सरकार बेळगावातील सीमा बांधवांवर जोरजबरदस्तीचा अत्याचार करीत आहे ना! मग हे रामशास्त्री कठोर होऊन या अन्यायाविरुद्ध चवताळून का बरे उठत नाहीत? माझगावचे कोर्ट गळते तसे गरीबांची घरे व झोपड्याही गळत आहेत, पण त्या गरीबास कोणतेच न्यायालय न्याय देत नाही. न्याय विकत मिळतो व न्यायदेवता आंधळी आहे या उक्तीवर ‘अंधश्रद्धा’ ठेवूनच आम्ही ‘यस, माय लॉर्ड’ म्हणून रामशास्त्र्यांपुढे झुकत आहोत. रामशास्त्री आज सरळ सरळ राजकारण करतात. त्यांच्या नेमणुकाच राजकीय आहेत. निवृत्तीनंतरही रामशास्त्र्यांना कुठे राज्यपाल तर कुठे लोकायुक्त, लोकपाल किंवा एखाद्या आयोगाचे अध्यक्षपद हवेच असते. रामशास्त्र्यांनी त्यांच्या भविष्याची चिंता जरूर करावी, पण महाराष्ट्राचा इतिहास, युगपुरुष शिवाजीराजांबद्दल वेडीवाकडी विधाने केलेली चालणार नाहीत. न्यायमंदिरे किंवा रामशास्त्र्यांचे वस्त्रहरण करण्याची आमची इच्छा नाही. तुम्ही किती सचोटीचे आहात याचे आत्मचिंतन तुम्हीच करावयाचे आहे, पण लोकांनी निवडून दिलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेचे ‘मालक’ होण्याचा प्रयत्न कराल तर न्यायसंस्थेवर जो थोडाफार विश्‍वास उरला आहे त्यालाही तडा जाईल. राजकारणी व्यक्तींनी जर विश्‍वास गमावला तर पुढच्या निवडणुकीत जनता त्यांना बदलू शकते, परंतु न्यायाधीशांवरचा म्हणजे रामशास्त्र्यांवरचा विश्‍वास उडाला तरी ते सहन करावे लागते, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. छत्रपती शिवाजीसारखा न्यायप्रिय राजा जगाच्या इतिहासात झाला नाही. रयतेच्या काडीसही हात लावू नका, असे आपल्या सैन्याला व सरदारांना बजावणारा हा राजा. स्त्रीचारित्र्यावर घाला घालणार्‍यांना कडेलोटाची सजा फर्मावणारा हा राजा महाराष्ट्रात जन्मास आला व इतिहास घडला. त्या राजाचे शिवस्मारक रोखण्याची भाषा कराल तर याद राखा! होय, माय लॉर्ड! तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवूनच आम्ही हे निर्भीडपणे सांगत आहोत. तुमचा कायदा तुमच्यापाशी. महाराष्ट्र फक्त शिवरायांना पुजतो व त्यांचाच कायदा मानतो!

- See more at : http://www.saamana.com/sampadkiya/shivrayanchya-watela-jau-naka#sthash.f83Wgx9b.dpuf

Wednesday 24 February 2016

ब्राह्मणवाद की क्या पहचान चली गयी रोहित की जान

हैदराबादेतील तरुण रोहित वेमुला याच्या आत्महत्येच्यानिषेधार्थ मंगळवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी विद्यार्थी. ‘ब्राह्मणवाद की क्या पहचान चली गयी रोहित की जान’, असे लिहिलेले फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.

Tuesday 23 February 2016

ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त हिंदू होते

ख्रिश्चन धमार्चे संस्थापक येशू ख्रिस्त तामिळ हिंदू होते असा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकात करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर हे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ बंधू असून आरएसएसच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी १४६ साली ‘ख्रिस्त परिचय’ हे पुस्तक लिहिले होते. त्यात हा दावा करण्यात आला आहे. येशू हे तामिळी ब्राह्मण होते. त्यांचे नाव केशव कृष्ण होते, असे गणेश सावरकरांनी या पुस्तकात म्हटले आहे. गणेश सावरकरांचा हा दावा हिंदू धर्मियांची दिशाभूल करणारा आहे. येशू ख्रिस्त हे हिंदू होते, हे खरे आहे. तथापि, ते ब्राह्मण नव्हे, तर मराठा होते.  त्याचे खरे नाव यशवंत होते. त्या काळी आजच्या सारखी आडनावे लावण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे येशू यांचे घराणे आडनावाच्या जागी क्षत्रिय असे उपनाम लावीत असे. छोट्या यशवंतला प्रेमाने येशू म्हटले जाई. त्यांच्या नावाचे हे लघुरूपच सर्वत्र प्रचलित झाले. तसेच ‘क्षत्रिय’चा अपभ्रंश ख्राईस्ट, ख्रिस्त असा झाला.

मुंबईतील एक ट्रस्ट गणेश दामोदर सावरकरांनी लिहिलेलं 'ख्रिस्त परिचय' पुस्तक पुन्हा प्रकाशित करीत आहे. या पुस्तकात येशू ख्रिस्त जन्माने विश्वकर्मा ब्राम्हण होते. तसंच ख्रिश्चन धर्म हा हिंदू धमार्चाच एक संप्रदाय आहे, ख्रिश्चन असा वेगळा धर्म नव्हता असा दावा करण्यात आला आहे. गणेश दामोदर सावरकर यांच्या पुस्तकात येशू ख्रिस्त यांचा जन्म कुठे झाला याची माहिती देण्यात आलेली नाही. गणेश दामोदर सावरकर यांनी येशूविषयी केलेले दावे पुढील प्रमाणे आहेत.

  • १. पॅलेस्टिन आणि अरब प्रदेश हिंदूंचाच होता आणि येशू ख्रिस्त प्रवास करत भारतात पोहोचले होते जिथे त्यांनी योगाचं शिक्षण घेतलं. 
  • २. येशू ख्रिस्त तामिळ हिंदू असून त्यांच खरं नाव केशव कृष्ण होतं. तामिळ त्यांची मातृभाषा होती आणि त्यांचा रंग तामिळ लोकांप्रमाणे गडद होता. 
  • ३. येशू ख्रिस्त यांच्या 12व्या वर्षी मंदिरात ब्राम्हण परंपरेप्रमाणे त्यांची पवित्र मुंज करण्यात आली होती. 
  • ४. पॅलेस्टीन तसेच आजूबाजुच्या प्रदेशात राहणारे लोक येशू ख्रिस्त यांना शंकर, विष्णुचा अवतार मानित असत.
  • ५. ख्रिश्चन धमार्चा पवित्र ग्रंथ बायबल ही येशू ख्रिस्त यांची शिकवण नसल्याचा दावा गणेश दामोदर सावरकर यांनी केला आहे. 

गणेश दामोदर सावरकर यांनी येशू यांचा इतिहास लिहिताना अनेक खोट्या गोष्टी रेटल्या आहेत. त्यांनी मांडलेला इतिहास कसा खोटा आहे, हे वरील ५ मुद्यांच्या बाबतीत तपशीलवार पाहू या :

  • १. येशू यांचा जन्म पॅलेस्टिनमध्ये नव्हे, तर महाराष्ट्रातील आताच्या फलटण येथे झाला. फलटणचे प्राचीन नाव फलस्तान (फळे देणारे ठिकाण) असे होते. येशू यांनी धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर जगभर भ्रमंती केली. व शेवटी ते अरब प्रदेश तसेच आजच्या इस्रायल, पॅलेस्टिन या भागात स्थिरावले. आपल्या जन्भूमीची आठवण म्हणून त्यांनी या भागाला फलस्तान असे नाव दिले. त्याचा अपभ्रंश होऊन पॅलेस्टिन झाले. आज हेच नाव रूढ असून, ते महाराष्ट्रातील फलटणची आठवण जागविणारेच आहे. 
  • २. गणेश दामोदर सावरकर यांनी म्हटल्याप्रमाणे येशू काळ्या रंगाचे तमिळी असते, तर  इस्रायल, पॅलेस्टिनमधील गो-या लोकांनी त्यांचा स्वीकार केलाच नसता. तसेच त्यांचे नाव नाव केशव कृष्ण असते, तर त्यांना येशू का म्हटले गेले असते? याचे उत्तर सावरकर देत नाहीत. 
  • ३. येशू यांची १२ वर्षी परंपरेप्रमाणे मुंज झाली असती, तर त्यांच्या गळ्यात जाणवे असते. तथापि, त्याचा कोठेही उल्लेख येत नाही. उलट येशू यांना मुकूट घातल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. त्यांना वधस्तंभावर चढविण्यात आले तेव्हाही, त्यांना काटेरी मुकूट घालण्यात आला होता. मुकूट घालण्याची प्रथा राजघराण्यात असते. येशू यांचा उल्लेख बायबलमध्ये ‘यहुद्यांचा राजा’ असाच येतो. त्यावरून ते राजघराण्यातील होते, हे सिद्ध होते. येशू हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध यादव वंशातील होते.  ‘यादव’चे 'यावद' व पुढे 'याहुद', 'यहुदा' असे रूप झाले. 
  • ४. फलस्तान म्हणजेच आजच्या पॅलेस्टिनच्या आजूबाजूच्या प्रदेशात राहणारे लोक येशू यांना भगवान शंकराचा अवतार मानून महेश असेही संबोधित असत. महेशचा अपभ्रंश होऊन महीस, मसीह अशी रुपे तयार झाली. त्यातूनच त्यांना येशू मसीह हे नाव मिळाले. मराठा समाज प्राचीन काळापासूनच शंकराचा उपासक राहिला आहे. मराठेशाहीची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शंकराच्या पिंडीवरच शपथ घेतली होती. हे येथे उल्लेखनीय होय.
  • ५. बायबलमधील शिकवण ही येशूचीच शिकवण आहे. त्या काळी महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या गोष्टीच येशू यांनी बायबलमध्ये सांगितल्या आहेत. 

Thursday 21 January 2016

To check radical Islamism, Tajikistan cops shave 13,000 men's beards


Tajikistan police is reported to have shaved nearly 13,000 men's beards and closed more than 160 shops selling traditional Muslim clothing to check "foreign" influences.

A report by Al Jazeera on Thursday said police in the central Asian Muslim-majority country also convinced more than 1,700 women to stop wearing headscarves in measures seen as the secular leadership's efforts to prevent influences from neighbouring Afghanistan.

Last week, Tajikistan's parliament banned Arab-sounding names, and marriages between first cousins, otherwise allowed in Islam.

Last year, Tajikistan's Supreme Court banned the Islamic Renaissance Party of Tajikistan - its only registered Islamic political party - following months of violence which the government blamed on radical Islam. President Imomali Rakhmon, who has been ruling since 1994, is likely to ratify the new laws which seek to promote secularism and discourage foreign influences. Rahmon's current term ends in 2020.

Rakhmon, 63, who was a state farm boss in the Soviet era, has gradually consolidated his power during 23 years of rule over the predominantly Muslim nation of eight million that went through a 1992-97 civil war in which tens of thousands died.

Tajikistan's parliament is also considering a proposal to allow Rakhmon to run for an unlimited number of terms, cementing his grip on power as others have done in the Central Asian region.

The main opposition force, the Islamic Renaissance Party of Tajikistan, failed to win any seats in parliament in the election last March and has since been outlawed by Rakhmon's government, with its leaders accused of plotting a coup.

Tuesday 19 January 2016

तर आज देशावर हिंदू महासभेची सत्ता असती

सावरकरांच्या हिंदुत्वावर आरएसएसने कावेबाजपणे मारला डला 

‘द विक’ या इंग्रजी नियतकालिकाने सावरकरांवर विशेषांक काढला आहे. निरंजन टकले यांनी लिहिलेला ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा मुख्य लेख आणि इतर काही लेख त्यात आहेत. भाजपाचे राज्यसभा सदस्य तरुण विजय यांचाही एक लेख अंकात आहे. ‘द लॅम्ब लॉयनाईज्ड’ या शीर्षकाचा स्वैर अनुवाद ‘सिंह म्हणून सादर करण्यात आलेली एक भित्री शेळी’ असा करता येईल. सावरकरांना झालेली काळ््या पाण्याची शिक्षा, त्यानंतर त्यांनी माफीसाठी इंग्रजांकडे वेळोवेळी केलेले विनंती अर्ज, सरकारने त्यांना माफी देऊन केलेली सुटका आणि त्यानंतर त्यांनी इंग्रज सरकारसाठी केलेले कार्य, असा सारा वृत्तांत या लेखात आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येत सावरकरांचा मुख्य हात होता, हा जीवनलाल कपूर आयोगाने काढलेला निष्कर्षही टकले यांनी लेखात विस्ताराने चर्चिला आहे. टकले यांच्या लेखात नवे असे काही नाही. या सर्व बाबी या आधीही अनेक वेळा माध्यमांतून आलेल्या आहेत. वाजपेयी सरकारने सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावले तेव्हा या सर्व बाबींवर विस्ताराने चर्चा झाली होती.  सावरकरांच्या जीवनात अनेक तेजस्वी घटना आहेत, तसे काही कच्चे दुवेही आहेत. सावरकर विरोधक त्यांच्या माफीनाम्याला तसेच नंतर त्यांनी ब्रिटिशांसाठी केलेल्या कामाला हायलाईट करीत राहतात. त्यावर उपाय न चालल्यामुळे  सावरकरवादी या सत्य घटनाचा नाकारित राहतात. सावरकरांच्या चरित्रातील सत्य घटना नाकारल्यामुळे  सावरकरांच्या जीवन चरित्रावरील काळी छाया आणखी गडद होते, हे सावरकर भक्तांना कळत नाही. ते आपला खोटेपणा रेटत राहतात. या गदारोळात सावरकरांचे योग्य मूल्यमापन झालेच नाही.
विनायक दामोदर सावरकर यांचे आपल्या कुटुंबियांसमवेतचे छायाचित्र. डावीकडून नारायण सावरकर, गणेश उपाख्य बाबाराव सावकर आणि विनायक सावरकर.
सावरकर हे व्यवहारवादी नव्हते. ते साहसवादी होते. भावनेच्या अधीन होऊन ते निर्णय घेत राहिले. त्याचा तोटा सावरकरांना आयुष्यभर सहन करावा लागला. गांधी हत्येचा डाग लागल्यामुळे ते काँग्रेसच्या टार्गेटवर राहिले. व्यवहारी राजकारण करता न आल्यामुळे त्यांनी स्वत: उभे केलेले हिंदुत्ववादाचे राजकारण त्यांच्या हातून निसटले. हिंदुत्वावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाने केव्हा कब्जा केला हे सावरकरांना कळलेच नाही. पुढे सावरकरांच्या अनुयायांनाही ही बाब नीट आकलन झाली नाही. याचे नीट आकलन झाले असते, तर आज देशावर भाजपा ऐवजी हिंदु महासभेची सत्ता असती.  आरएसएस नियंत्रित भाजपाची सत्ता ही आपलीच सत्ता आहे, असा भ्रम सावरकरवाद्यांनी तसेच हिंदू महासभेच्या नेत्यांनी करून घेतला आहे. त्यातून हे लोक जितके लवकर बाहेर येतील, तितके चांगले आहे.

हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी निर्माण केला. त्याची नीट व्याख्या केली. हिंदुत्वाला राजकीय महत्त्वही मिळवून दिले. तथापि, नंतरच्या काळात आपली सगळी शक्ती त्यांनी महात्मा गांधी यांना विरोध करण्यातच खर्ची घातली. त्यातून गांधी हत्या झाली आणि सावरकर व सावरकरवाद्यांचे राजकारण कायमचे संपले. राष्टÑीय स्वयंसेवक संघाने नेमके याच्या उलट केले. गांधींच्या धोरणांना विरोध असला तरी, उघड विरोध करण्याचे धोरण आरएसएसने स्वीकारले नाही. उलट महात्मा गांधी यांना आपल्या प्रात: स्मरणीय महापुरुषांच्या यादीत स्थान दिले.  याचा परिणाम असा झाला की, बदनामीचा डाग सावरकर आणि हिंदु महासभेवर आला तर त्यातून राजकीय लाभ रूपी फळ मात्र आरएसएसला मिळाले.

सावरकरांचा हिंदुत्ववाद पळवून आरएसएसने संपूर्ण भारतावर ताबा मिळविला आहे, ही बाब प्रत्यक्ष हिंदुमहासभेचे नेते आणि सावरकरवादी विचारवंत यांच्या अजूनही लक्षात आलेली नाही. नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर आरएसएसने त्याच्यापासून स्वत:ला दूर केले. नथुरामचा आरएसएसशी काहीही संबंध नाही, असे आरएसएसच्या वतीने जाहीर करण्यात आले. हा धोरणीपणा हिंदू महासभेला दाखविता आला नाही. महात्मा गांधी यांची हत्या होऊन आता ७0 वर्षे होत आलेली आहेत, तरीही हिंदू महासभेचे लोक सुधारायला तयार नाहीत. मोदी सरकार सत्तेवर येताच नथुराम गोडसेचे पुतळे उभारण्याची भाषा हिंदू महासभेचे नेते करीत आहेत. या मागणीपासूनही आरएसएसने लगेच स्वत:ला दूर केले आहे. मा. गो. वैद्य यांनी खास निवेदन काढून नथुरामचे पुतळे उभारण्याच्या मागणीला विरोध केला. या पासून तरी हिंदू महासभा आणि सावरकरवाद्यांनी काही बोध घ्यायला हवा.

Friday 8 January 2016

ISIS militant Ali Saqr al-Qasem publicly executes his own mother in Raqqa after accusing her of 'apostasy'

LONDON: In a shocking low even by the standards of the Islamic State, a militant has publicly executed his own mother after accusing her of apostasy.

The activist group Raqqa is Being Slaughtered Silently (RIBSS) said 20-year-old jihadi Ali Saqr al-Qasem shot his mother Lena, 45, in the head with an assault rifle in front of a large crowd.

Lena al-Qasem is understood to have been accused of apostasy - a crime that usually means leaving one's religion but in practise is used by ISIS as a justification for murdering anybody who doesn't support or speaks out against the terror group.

The exact charge against Ms al-Qasem was "inciting her son to leave the Islamic State and escaping together to the outside of Raqqa", according to the Syrian Observatory of Human Rights.

The UK-based conflict monitor said Ali Saqr al-Qasem had reported his mother to his ISIS superiors, who then sentenced her to death and ordered him be the one to kill her.

The Observatory said hundreds of people turned out to watch Ms al-Qasem's execution.

It is not known why her son was given the task of killing his own mother but the reason the execution took place outside Raqqa's post office is because that is where Ms al-Qasem had worked.

The news comes as ISIS' chief spokesman in neighbouring Iraq, Abu Mohammed al-Adnani, was reportedly left with severe injuries following an airstrike.

Al-Adnani, who has been singled out as a potential successor should anything happen to ISIS' leader Abu Bakr al-Baghdadi, required initial emergency treatment in the jihadi-held city of Hit after losing large amounts of blood, Iraq's Joint Operations Command said.

He has since been moved to ISIS' Iraq-stronghold of Mosul, MailOnline reported, adding that his condition remains unknown.